जवळ असणा-या गोष्टी अचानक कधीतरी आपण दूर लोटतो, पण मग दूर गेल्यानंतर त्या आपल्याला पुन्हा हवयाहव्याशा वाटतात. मग पुन्हा आपण त्यांना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. पण जेवढे त्याच्या पाठीमागे लागतो..तेवढ्याच त्या आणखी दूर जातात. मग शेवटी आपल्याला वाईट वाटतं. आपण थकतो, अन त्याचा नाद सोडून देतो. मग मात्र अचानक..अलगद..ती गोष्ट नकळत पुन्हा आपल्या जवळ येते. व. पुं च्या म्हणण्याप्रमाणॆ ’हवी ती गोष्ट हवी तेव्हा न मिळणं यालाच जीवन म्हणतात!’ हेच खरं! सगळं हवं ते मिळालं असतं तर आपण कशासाठी धडपडलो असतो, नाही का? कुणालातरी, काहीतरी हवं असतं, म्हणूनच माणसं जगतात. मग ते प्रेम असो, मैत्री असो किंवा पैसा. सगळं सेमच..निरपेक्ष जगणारी माणसं विरळाच. मग ते मिळवण्यासाठी आपण नाती जोडतो..कधी रक्ताची, तर कधी मनाने बांधलेली..एकमेकांच्या कोशात नकळत डोकवायला लागतो..सुखदु:खात आधार शोधायला लागतो..
पण सारं काही करून, मिळवून..समाधानापासून दूरच असतो..असे का?
पण सारं काही करून, मिळवून..समाधानापासून दूरच असतो..असे का?
No comments:
Post a Comment